पूजा अर्चा……..
नवस बोलून, व्रत करून ,वडाची पूजा करून सातजन्म एखाद्याला बांधून ठेवता येते का कधी?पूर्वीच्या स्त्रियांना बाहेर एकत्र पडायला वाव मिळावा म्हणून नागपंचमी (म्हणजे वारुळाला एकत्र जाता येत असे),वटपौर्णिमा असे सण असत।ते आपल्या मागच्या पिढीनेच समाजात रुजवले आहेत।आता
काळानुरूप त्यात बदल व्हायलाच हवेत।
आपल्याला हवे तर उपवास धरावा।तो आपल्या साठी उपयुक्त आहे कारण लंघन केल्याने फायदाच होतो हे सिद्ध झाले आहे।शेवटी एवढेच की कर्मकांड,अंधश्रद्धा,यातून आता बाहेर पडुयात.समाजात असे अनेक वर्ग आहेत त्यांना आपल्या मदतीची गरज आहे।तिथे जाऊन प्रत्यक्ष किंवा घरी राहून अप्रत्यक्ष काही मदत करता आली तर याचा विचार करू।ते कधी ही अशा पूजा अर्चा पेक्षा कैक पटीने योग्य आहे।
शेवटी हा माझा दृष्टीकोन आहे आणि माझ्या दृष्टी ने तो योग्य आहे।आपण ही विचार करावा।कर्मकांडा पेक्षा मानस पूजेवर जोर द्यावा ।बघा किती छान आनंद मिळतो ते।
आजकाल वेगवेगळ्या देवतांची वेगवेगळी नवरात्र करून आजची वर्किंग वुमन किती दमते हे मी बघते आहे।त्यांया रोजच्या पूजा,नेवैद्य,सवाष्ण,शिवाय घरातल्या माणसांचे मुलांचे आणि नोकरी,बिझनेस कसे आणि किती अवघड आहे।आता स्त्रियांनीच यातला सोप्पा आणि सुकर मार्ग शोधायला हवा।तुम्हाला कोणी येऊन सांगणार नाही।किती दमवायचे आपल्या शरीराला आणि मनाला हे तिनेच ठरवायचे आहे।
बरोबरीचा जमाना आहे।आता इतर क्षेत्राबरोबर सीमेवर लढायला ही स्त्री तयार झाली आहे मग हे असले बिनकामाच्या सोवळ्या ओवळ्यात अडकण्याचं काहीच कारण नाही।जबरदस्ती तर कुणीच करू शकत नाहीत तर मग विचार करा आणि मनाचे ऐका।
मानस पूजेवर जोर द्या।
बाकी आपण सारेच सुज्ञ आहातच।
पल्लवी उमेश
8/6/2017
Watch “गीतेश्वरी: श्रीमद्भगवद्गीता अध्याय पहिला (श्लोक ३१ ते ३५) | Shrimad BhagavadGita Adhyay 1 in Marathi” on YouTube
Watch “गीतेश्वरी: श्रीमद्भगवद्गीता अध्याय पहिला (श्लोक२६ ते ३०) | Shrimad Bhagavad Gita Adhyay 1 in Marathi” on YouTube
आजचा पहिला अध्याय श्लोक क्रमांक 26 ते 30 मध्ये अर्जुन विषाद खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.
आपलेच स्वजन समोर बघून अर्जुनाची झालेली स्थिती आपल्याला या श्लोकां मधून दिसते..
नक्की न चुकवता हा भाग बघावा असाच आहे.
धन्यवाद🙏
अलक
अलक
दोन्ही मुले आपल्या परिवारासह अमेरिकेत स्थायिक असल्याने कमला ताईंना नातवंडांचे सुख मिळेना.आजी ची नातवंडांच्या विषयीची हौसमौज काही केल्या पूर्ण होईना.मग एके दिवशी ठाम निर्णय घेऊन त्या आजूबाजूच्या सोसायटी मध्ये जाऊन आल्या आणि मग रविवारी त्यांच्या कडे हॉल भरून मुले संस्कार वर्गात दाखल झाली. हीच माझी नातवंडं म्हणत त्यांचा आटलेला प्रेमाचा झरा वाहू लागला….अखंड…अविरत..
…………………………………………………..
पल्लवी उमेश
जयसिंगपूर
अलक
अलक
पहाडासारखा माझा बाप आज असाह्य होऊन समोरचे दृश्य पाहून विचलित झालेला पहात होते .जेंव्हा आईला शेवटच्या प्रवासासाठी चौघांनी हात दिला त्याक्षणी फोडलेला टाहो ऐकून ‘दगडाला पाझर फुटणे’ या वाक्य प्रचाराचा अर्थ कळाला.
…………………………………………………..
©पल्लवी उमेश
You must be logged in to post a comment.